A marathi poem published in 2005 about our very own Ganesha Festival in leading Marathi newspaper Dainik Sakal. This writing has a contemporary human face to express the pain when the author sees what the society has lost during years of 'change'. (Dr. Atul Rakshe: Sakal, Sunday, 28/08/2005) गणराया... स. न. वि. वि. म्हटलं, तू इकडे यायला निघाला असशील; जरा बोलावं तुझ्याशी.कसा येणारेस? एस्. टी. बसनं? शिवाजीनगर, स्टेशन किंवा स्वारगेटहून येवू नकोस बाबा! घुसमट गर्दी अन् गाडयांच्या गोंधळात पायांखालचा रस्ता म्हणजे चक्रव्यूहच वाटेल तुला! रेल्वेनं? ये बापडा! पण अगदी दूरपासूनंच सोंड दाबून धर! आमच्या स्टेशनवरची घाण सोसायची नाही तुला. एकुलत्या एक पादचारी पुलावरूनही सावकाश उतर बाबा! पुढं जरा सांभाळून... सक्तीची शिरस्त्राणं घालून ताशी दहा किलोमीटरच्या अस्मानी वेगानं खड्डे चुकवत दुचाक्यांवरनं चाललेलो आम्ही पामर पोटार्थी भक्तगण तुला ऒळखूच यायचो नाही बहुधा! वक्रतुंडा... 'पीएम् टी' म्हणजे काय ते ठाऊकाय का रे तुला? वर तुमच्याकडं तो यमाचा रेडा आहे ना; खाली त्याचे भाऊबंद आहेत चारचाकी- तेच 'पी एम् टी'! 'पी एम् टी' तूनच ये! आमच्या या सांस्कृतिक राजधानीच्या सामाजिक अध:पाताचं झकास दर्शन होईल तुला! बा विघ्नहरा! मांढरदेवी, विठोबा, जगन्नाथ, केदारनाथ- तुम्ही सारे 'यात्राप्रिय' बाप्पालोक एकाच गल्लीत राहता का रे वरती? म्हटलं, दरवर्षी नेमानं दहा दिवसांसाठी येतोस, दहाव्या दिवशी तिऱ्हाईतासारखा निघूनही जातोस... तू जाताना बॅंडबाजे, दारू अन् आतिषबाजीच्या सरधोपट सवयीमुळे तुझ्या विरहाचं सोड; तुझं अस्तित्त्वही जाणवत नाही आम्हाला. -कि ते जाणवून देण्यासाठी मांढरदेवीसारखी 'शॉक ट्रिटमेंट'ची व्यवस्था केलीयस तूदेखील? हे विद्येच्या देवा! ये रे! ये रे!! म्हणून आग्रहानं बोलावलेल्या अन् आता जा रे! जा रे!! म्हणूनही न जाणाऱ्या अघोरी पावसाकरवी कसला धडा देतोयस आम्हाला? की आमच्या कर्माचा घडा भरलाय याची पूर्वसूचना आहे ही